रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ….! संग्रामपूर तालुक्यातील 57698 लाभार्थ्यांची ई- केवायसी बाकी न केल्यास धान्य मिळणार नाही….! रेशनकार्ड धारकांनी 31 ऑक्टोबर पर्यंत ई केवायसी करावी- पुरवठा निरीक्षण अधिकारी कोमल रोडे !

0
66

रेशनकार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी ….! संग्रामपूर तालुक्यातील 57698 लाभार्थ्यांची ई- केवायसी बाकी न केल्यास धान्य मिळणार नाही….! रेशनकार्ड धारकांनी 31 ऑक्टोबर पर्यंत ई केवायसी करावी- पुरवठा निरीक्षण अधिकारी कोमल रोडे !

दयालसिंग चव्हाण,
संग्रामपूर /- तालुक्यातील शिधापत्रक धारकांना येणाऱ्या 31 ऑक्टोबर पर्यंत ई केवायसी करावी अन्यथा शिधापत्रक होईल रद्द असे आवाहन संग्रामपूर पुरवठा विभाग निरीक्षण अधिकारी कोमल रोडे यांनी केले आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजने अंतर्गत गरीब गरजूंना अत्यन्त कमी दरात रेशनधारकांचा पुरवठा होतो. त्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधा पत्रिका धारकांना आता ई केवायसी करण्याची अट घातली आहे.योजनेतील बनावट लाभार्थ्यांना शोध ई केवायसीतुन लागणार आहे.ही प्रकिया पूर्ण करण्यासाठी 31 ऑक्टोबर पर्यन्त मुदत देण्यात आली असून ई केवायसी न केलेल्यांचे रेशन धान्य बंद होणार असल्याची माहिती आहे.

संग्रामपूर तालुक्यातील अन्नधान्य घेणाऱ्या सवलत रेशन कार्डधारकांनी शिधापत्रिकेत नावे असणाऱ्या आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींनी आपले विभागा अंतर्गत असणाऱ्या दुकानात जावू न तेथे उपलब्ध दिलेल्या ईपॉस डिजिटल यंत्रणामध्ये सर्वांचे आधार क्रमांक दाखल करावा. काही वेळातच ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. स्थलांतरित कुटुंबातील देखील कुटुंबाने आपले रेशन दुकानात जावून ई केवायसी करावी ,त्यामध्ये रेशन धान्य दुकानातून धान्य वाटप होणाऱ्या रेशन देण्याची खरी पडताळणी होईल, व स्वस्त धान्य दुकानदारांना वेगळ्या मार्गाने धान्य विकता येणार नाही.हा मूळ उद्देश या योजनेचा आहे. तरी सर्व सर्व धारक रेशन कार्डधारकांनी त्वरित केवायसी करावी. असे आव्हान अन्नपुरवठा अधिकारी कोमल रोडे यांनी केले आहे.

संग्रामपूर तालुक्यातील एकूण 115945 लाभार्थी असून यापैकी 58256 लाभार्थ्यांची ई केवायसी झाली असून 57698 लाभार्थ्यांची ई केवायसी होणे बाकी आहे त्याकरिता येत्या 31 ऑक्टोबर पर्यंत लाभार्थ्यांनी ई केवायसी करावी , राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना अंतर्गत गोरगरीब रेशन काही रेशनकांना मोफत रेशन मिळते ,तर काहींना सवलतीचे दरात रेशन मिळते. त्यामुळे ह्या योजनेचा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना आता शासनाने इ केवायसी करण्याची अट घातली आहे यामुळे बनावट रेशन दुकान धारकांना चाप बसेल या दृष्टिकोनातून हा निर्णय घेतला आहे. जे लाभार्थी केवायसी करणार नाहीत त्यांना लाभ मिळणार नाही. असे आवाहन संग्रामपूर पुरवठा विभाग निरीक्षण अधिकारी कोमल रोडे यांनी केले आहे.