“जो मंच पर उपर बैठे है उनको समालो”, “खाली बसलेला कार्यकर्ता म्हणतो”, वातावरण अत्यंत चांगला ,पण धोका….! मुकुल वासनिकांनी कॉग्रेसचे माजी आमदारांसह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे टोचले कान; संग्रामपूर येथील स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचारासाठी आढावा बैठक !
दयालसिंग चव्हाण..
संग्रामपूर /- “जो मंच पर उपर बैठे है उनको समालो”, “खाली बसलेला कार्यकर्ता म्हणतो”, “कृष्णरावजी सगळ्या नजरा तुमच्याकडे आहे”, ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांना काम करायचं हे त्यांना सांगायची गरज नाही…काही जण उमेदवारी न मिळाली त्यामुळे नाराज आहे…माजी आमदाराची मुलगी उमेदवार आहे,त्यांनाच तर सांगायची गरजच नाही…वातावरण अत्यंत चांगले असून धोका होऊ शकतो…? माजी आमदारासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांचे कॉग्रेसचे महासचिव खासदार मुकुल वासनिक यांनी चांगलेच कान टोचले, पुन्हा पुन्हा पडल्यानंतर उमेदवारी घ्यायची नाही असाही टोला त्यांनी लगावला,जळगांव जामोद विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार कॉग्रेसच्या माजी आमदार कृष्णराव इंगळे यांची कन्या डॉ.स्वातीताई वाकेकर यांच्या प्रचारार्थ आज 13 नोव्हेंबर रोजी काँग्रेस पक्षाचे महासचिव खा.मुकुल वासनिक यांच्या संग्रामपूर तालुका दौरा असून दुपारी संग्रामपूर शहरात आढावा बैठक पार पडली.त्यावेळी ते बोलत होते.
निवडणूक जाहीर झाल्यानंतर उमेदवारी मिळण्यासाठी महाविकास आघाडीतील डझनभर नेते त्या लाईनमध्ये असतांना पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही, तर मागील दोन वर्षांपासून या मतदारसंघात निवडणूक लढवीत आहे त्या माजी आमदार कृष्णराव इंगळे यांची कन्या डॉ.स्वातीताई वाकेकर यांनाच पुन्हा उमेदवारी मिळाल्याने मित्रपक्षसह कॉग्रेस पदाधिकाऱ्यांची नाराजी झाली होती.आज कॉग्रेसचे महासचिव यांचा संग्रामपूर तालुक्यात दौरा असून संग्रामपूर शहरात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. याबैठकीत माजी आमदार कृष्णराव इंगळे, राष्ट्रवादीचे प्रसनजीत पाटील, राम विजय बुरुंगले,आणि इतर महाविकास आघाडीतील नेते, पदाधिकारी कार्यकर्ते ,आणि संग्रामपूर तालुक्यातील नागरिक,महिला उपस्थित होते.
यावेळी कॉग्रेसचे महासचिव बोलतांना म्हणाले की, मंचकावर सर्व एकत्र आले आहेत, पण खाली बसलेला कार्यकर्ता म्हणतो, हम तो सब ठीक है ,जो उपर बैठे है उनको समालो, असे म्हणत तुम्ही एकत्र राहाल याची मला शंका नाही, कृष्णरावजी सगळ्या नजरा तुमच्याकडे आहे तुम्ही देखील भावना लक्षात घेतील असेही मत त्यांनी व्यक्त केले, माजी आमदारावर मतदारसंघातील नागरिकांची नाराजी असून ते दुर करावी असे थेट कृष्णराव तुमच्याकडे सर्वांचे लक्ष आहे असं म्हणत त्यांना सांगितले, सर्व पुढाऱ्यांचे चांगलेच कान टोचले,समोर बसलले सर्व जण आणि वर बसलेले नेतमंडळी तुम्ही काम्हाला लागा नाही तर असं नाही होयला पाहिजे की, तुम्हीच निघून जायचं ….असेही बोलतांना त्यांनी सांगितले.माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्यावर मतदार संघातील समाज बांधवसह नागरिक नाराज असल्याची कुजबुज सुरू असून महाविकास आघाडीमध्ये वाद सुरु असल्याच्या चर्चा होत आहे.

